Anand Niragude : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा वाद सुरु असताना राज्य सरकार आणि प्रशासनाकडून आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप, दबाव यांसह विविध कारणांमुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या तीन सदस्यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामध्ये आता आयोगाच्या अध्यक्षांची भर पडली आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असतानाच माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी ही वेळ निवडल्याने सर्वांचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. राजीनामा देताना निरगुडे यांनी देखील विविध आरोप केल्याचे समोर येत आहे. निरगुडे यांचा राजीनामा ओबीसी मंत्रालयाचे अवर सचिव नरेंद्र आहेर यांनी स्वीकारला आहे.
यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत शिंदे सरकार टीका केली आहे. माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले,’माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राज्य मागसवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची बाब सरकारने आठ दिवस दडवून ठेवली. या सगळ्यात काय लपवाछपवी सुरु आहे, हे पाहिलं पाहिजे. आयोगावर कुठल्या प्रकारचा अहवाल द्यावा.’ यासाठी दबाव असल्याची बाब मात्र यानिमित्ताने स्पष्ट झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.