उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून माहिती
मुंबई : आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला, किती कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असे अनेक प्रश्न सरकारकडून विचारले जात आहेत. त्याची उत्तरे आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमूान दिली आहेत. आतापर्यंत 11 हजार 468 कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत शुक्रवार, दि. १३ मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १८ लाख २ हजार ४३ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११,४६८.३६ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 15, 2020
अजित पवार यांनी याबाबत सविस्तर ट्विट केले आहे. ते असे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत शुक्रवार, दि. 13 मार्च 2020 पर्यंत राज्यातल्या 18 लाख 2 हजार 43 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 11 हजार 468.36 रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा की मार्चपर्यंत राज्यातील 17 लाख 2 हजार 43 शेतकऱ्यांना सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे.
जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४ हजार ४४७ शेतकऱ्यांच्या खात्यात ५२७५.८६ कोटींची तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ७ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांच्या खात्यात ६१९२.५० कोटी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 15, 2020
अजित पवार यांनी आणखी एक ट्विट करून कोणत्या बॅंकांमध्ये किती रक्कम जमा केली, हेही स्पष्ट केले आहे. त्यांनी ट्विट केले की, जिल्हा सहकारी बॅंकांच्या माध्यमातून 10 लाख 4 हजार 447 शेतकऱ्यांच्या खात्यात 5275.86 कोटींची तर, व्यापारी बॅंकांच्या माध्यमातून 7 लाख 97 हजार 586 शेतकऱ्यांच्या खात्यात 6192.50 कोटी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.