पुणे – शहरातील डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटने (डीएसटी) अधिक रसदार द्राक्षांचे उत्पादनाचे वाण विकसित केले आहे. “डीएसटी’च्या स्वायत्त आघारकर संशोधन संस्थेतील (एआरआय) शास्त्रज्ञांनी ही द्राक्षाची संकरित जात विकसित केली आहे.
बुरशीजन्य संसर्गाला प्रतिबंध करणारी, झुपकेदार आणि उत्तम रसाचा दर्जा असणारी आहे. याचा उपयोग पेय, मनुका, जॅम, रेड वाइन करण्यासाठी करता येणार असून, शेतकऱ्यांना एक चांगला वाण उपलब्ध होणार आहे.
डॉ. सुजाता टेटली यांनी आवश्यक गुणधर्मांवर काम करून ही द्राक्षाची विशिष्ट “एआरआय-516′ ही प्रजाती विकसित केली आहे.
“एआरआय-516′ हा बुरशीजन्य संसर्गरोधक हा गुण अमेरिकन जातीचे द्राक्ष असलेल्या काटवापासून उत्पन्न झाला आहे. यामध्ये उत्तम दर्जाची फलन क्षमता आणि प्रति युनिट उत्पन्न क्षमता आहे. ही संकरित जात लवकर पिकविण्यासाठी मळणीनंतर 110-120 दिवस लागतात. या जातीमध्ये द्राक्षाचे लांबलचक गुच्छ आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये आढळतात.
द्राक्ष उत्पादनामध्ये भरताचा जगात बारावा क्रमांक लागतो. साधारणपणे 78टक्के द्राक्ष उत्पादन हे उपयोगात आणले जाते. 17-20 टक्के हे मनुका, 1.5 टक्के वाइन आणि 0.5 टक्के ज्यूस निर्मितीसाठी वापरले जातो. भारतात महाराष्ट्र हा द्राक्ष उत्पादनावर अग्रेसर आहे, जो 81.22 टक्के उत्पादन करतो. फार कमी प्रमाण ज्यूससाठी वापरले जाते. महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी सीडलेस द्राक्षाची लागवड करतो. ज्याचा उपयोग मनुका तयार करण्यासाठी अधिक होतो.
या जाती बुरशीजन्य संसर्गरोगावर अत्यंत संवेदनशील प्रभाव करतात. यामुळे वनस्पती संरक्षण खर्च वाढतो. कापणीनंतरच्या द्राक्षात 8.23-16 टक्के नुकसान होते. काढणीनंतरचा तोटा कमी करण्यासाठी ज्यूस तयार करणे हा एक चांगला पर्याय आहे.