मुंबई – काही दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. भारतातील दैनंदिन रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र देशातील दैनंदिन कोरोनारुग्णांची संख्या 4 लाखांच्या पार जाण्याची शक्यता नाही, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
याच बरोबर देशभरात कोरोना विषाणू मार्ग बदलत आहे. कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसारही कमी झाला आहे.
या विश्लेषणानुसार, मुंबई आणि दिल्लीमध्ये जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कोरोनारुग्णांचा उच्चांक गाठला आहे, तर बेंगळुरू 22 जानेवारी रोजी कोरोनारुग्णांचा उच्चांक गाठेल.
शास्त्रज्ञांना कोरोनाच्या परिस्थितीच्या ताज्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, भारतातील तिसऱ्या लाटेचा उच्चांक 23 जानेवारी रोजी दिसून येईल मात्र, दैनंदिन कोरोनारुग्णांची संख्या चार लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. कोविड ट्रॅकरच्या सूत्र मॉडेलने सांगितले की, मुंबई आणि दिल्लीने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे.
आयआयटीचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल, सूत्र संघाच्या संशोधकांपैकी एक, जे साथीच्या रोगाच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या आकडेवारीवर संशोधन करत आहेत.