पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संधिवात व्यवस्थापनासाठी समग्र दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे असे मत राष्ट्रीय संधिवात रुग्ण परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केले. हवामान आणि ऋतू बदल, प्रदूषण, आहार आणि पारंपरिक उपचार पद्धती यांचा संधिवातावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.
मिशन आर्थ्रायटिस इंडिया (माई) च्या वतीने आयोजित परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भारती विद्यापीठ हॉस्पिटल विभागप्रमुख डॉ. कविता कृष्णा, सेंटर फॉर र्हुमॅटिक डिसिजेस् (सीआरडी) चे वरिष्ठ र्हुमॅटॉलॉजिस्ट डॉ. अरविंद चोप्रा, माईच्या अध्यक्षा दीपा मेहता, उपाध्यक्षा डॉ. अनुराधा वेणूगोपालन, सचिव श्वेता कुलकर्णी, माईच्या विश्वस्त राणी पारसनीस, शरयू भट आणि फिजियोथेरेपिस्ट डॉ. नीलिमा बेडेकर आदी उपस्थित होते.
या परिषदेत मिशन आर्थ्रायटिस इंडिया (माई) च्या माजी अध्यक्षा श्रीमती शिवानी बर्वे यांना कै. श्री. पी. सी. नहार वक्तृत्व पुरस्कार, स्टँड फॉर एंकिलोझिंगचे जिमित ठक्कर यांना श्री. हरिभाऊ राठीजी वात विरुद्ध योद्धा पुरस्कार, तर सेंटर फॉर र्हुमॅटिक डिसिजेस् (सीआरडी) तर्फे वात विरुद्ध योद्धा पुरस्कार सुप्रिया शिंदे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबोली बुरांडे आणि डॉ. अनुराधा वेणूगोपालन यांनी केले.