गोवाहटी – गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती गंभीर बनली आहे. पूराचा फटका 25 जिल्ह्यांना बसला असून पुरामुळे तब्बल 14 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. दरम्यान, कामरूप या गावाला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून या गावातील नागरिक पूरामुळे प्रभावित झाले आहेत. तत्पूर्वी, आसाममधील एकूण 2, 168 गावे पाण्याखाली गेली आहेत. तर 51,752 हेक्टर जमिनीवरील शेतीचे नुकसान झाले आहे.
Assam: Kampur Guimari village flooded after the level of water of Brahmaputra river rises in Nagaon, following heavy rainfall in the area. pic.twitter.com/a4Ah1bNpPV
— ANI (@ANI) July 18, 2019