लातूर – लातूर जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या राज्य परिवहन बसला काल रात्री अचानक आग लागली मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले.
रविवारी आणि सोमवारच्या मध्यरात्री जळकोट तालुक्यातील उमरदरा गावाजवळ हा प्रकार घडला. ही बस उदगीरहून उमरडा गावाकडे जात असताना वाटेत बिघाड झाल्याने, रस्त्याच्या कडेला उभी होती, मात्र मध्यरात्री अचानक दीड वाजण्याच्या सुमाराला बसने पेट घेतला.
आग लागली तेव्हा चालक आणि कंडक्टर बसमध्ये झोपले होते पण त्यांना आगाची वार्ता लागताच ते झटकन जागे झाले आणि त्यांनी आपले प्राण वाचवले. बस मधील प्रवासी आधीच निघून गेले होते. त्यामुळे कोणालाही हानी पोहचली नाही. आगीचे नेमके कारण अजून समजलेले नाही.