नवी दिल्ली – सर्जिकल स्ट्राईक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्हे तर भारतीय सैन्याने केले आहे. मोदी श्रेय घेऊन सैन्याचा अपमान करत आहेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
Rahul Gandhi: The Army,Air Force or Navy are not personal properties of Narendra Modi ji like he thinks. When he says that surgical strikes during UPA were done in video games then he is not insulting Congress but the Army. pic.twitter.com/wAPPISCXUq
— ANI (@ANI) May 4, 2019
राहुल गांधी म्हणाले, मसूद अझहरची सुटका भाजपाच्या काळातच झाली होती, मात्र काँग्रेसने कधीही दहशतवाद्याला सोडले नव्हते, असा दावा त्यांनी केला. शेतकरी, भ्रष्टाचार, रोजगार हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आहेत. निवडणूक जिंकणे हे काँग्रेसचे लक्ष्य असून पंतप्रधान कोण होणार, हे जनताच ठरवेल, असे त्यांनी सांगितले.
Rahul Gandhi: Strictest of actions should be taken against Masood Azhar, but who sent him back to Pakistan? Who bowed down to terror and released him? Not the Congress, but it was the BJP Govt. pic.twitter.com/nbdmHksHmB
— ANI (@ANI) May 4, 2019
राफेल करारावरुन टीका करताना राहुल गांधी म्हणाले, चौकीदार चोर आहे हे खरे आहे. चौकीदाराने हजारो कोटी रुपये त्याच्या उद्योगपती मित्रांच्या खिशात टाकले. पंतप्रधानांकडे तज्ज्ञमंडळी नाहीत, जी आहेत त्यांचा वापर केला जात नाही. त्यामुळेच राफेल करारावर मोदी माझ्यासोबत खुली चर्चा करत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, असेही त्यांनी सांगितले.
Rahul Gandhi: The biggest issue right now is unemployment and the way Modi ji has destroyed the economy. Country is asking that Modi ji you promised us 2 crore jobs,what about that? He doesn't speak a word on jobs or farmers as he has nothing to say pic.twitter.com/ubNt4evy1O
— ANI (@ANI) May 4, 2019