चिंबळी -केळगाव (ता. खेड) येथील ओढ्यावर साकव पुलावरील भगदाड अखेर दोन महिन्यांनंतर बुजवण्यात आले आहे. पण पुलावरील खड्डे बुजवण्यात न आल्याने संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
साकव पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. तर एका ठिकाणी मोठे भगदाड पडले असल्याने अपघातचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पुलावरील खड्ड्यांसह भगदड बुजवण्यात यावे, अशी वारंवार मागणी होत होत होती.
मात्र, कोणी लक्ष देत नव्हते. अखेर गेल्या आठवड्यात भगदाड बुजवण्यात आहे; परंतु मध्यभागी पडलेले दोन-तीन खड्डे तसेच ठेवल्याने संबंधित विभागाच्या ढिसाळ कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.