अकोले (प्रतिनिधी) – अकोले शहरापासून जवळच असणाऱ्या कुंभेफळ रस्त्यावर पाठलाग करून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पिकअपमधून कत्तलखान्याकडे नेण्यात येणाऱ्या सहा गोवंश जणावरांची सुटका केली होती. या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गोट्या ऊर्फ परवेज अमीर अली शेख याला अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत विश्वहिंदू परिषदेचे कार्यकर्ते संदीप रसाळ यांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीत म्हटले आहे की, आपण घरी जात असताना सोमवारी (दि. 22) रात्री साडेआठ वाजनेच्या सुमारास विशाल मारुती पवार याने कुंभेफळ रस्त्यावर पिकअपमधून (क्र.एमएच- 14 एफटी- 0446) तीन गायी व तीन वासरे दाटीवाटीने संगमनेरच्या दिशेने नेत असताना आम्ही चालकास ताब्यात घेतले. एक जण पळून गेला आहे, असे दूरध्वनीवरून सांगितले.
यावेळी आपण तेथे गेलो असता पिकअपमध्ये जनावरे आढळून आली. त्यानंतर आपण, विशाल मारुती पवार, भाऊसाहेब बाबूराव चव्हाण, भारत भाऊसाहेब चव्हाण, दत्तात्रय किसन नवले, जयसिंग चंदन बोऱ्हाडे, विनायक नरहरी साबळे यांच्या मदतीने पिकअपसह जनावरे व चालकास अकोले पोलीस ठाण्यात घेऊन आलो. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.