पिंपरी – पुणे- मुंबई एक्स्प्रेसवे वरूनप्रवास करणाऱ्या वाहनांना 1 एप्रिल 2023 पासून 18 टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. एक्स्प्रेसवेवर प्रगतीपथावर काम असलेल्या मिसिंग लिंकच्या कामाच्या अतिरिक्त खर्चामुळे या मार्गावरील टोलवाढ झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या या माहितीमुळे दुधारित टोलवाढीची कारणे स्पष्ट झाली आहेत.
पुणे-मुंबई द्रुतगतीवर साडे चार महिन्यांपुर्वी टोलवाढ लागु करण्यात आली आहे. या टोलवाढीचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समर्थन केले आहे; आणि ही टोलवाढ का करण्यात आली आहे याचे कारणदेखील सांगितले आहे. अजित पवार पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग चकाचक करण्यात आला आहे. या मार्गावर कोट्यवधी पैसे खर्च करण्यात आले आहे, मार्गावर चांगल्या सुविधा पुरवण्यात येत आहेत, त्यामुळे टोल वाढ करण्यात आली आहे. तुम्ही जुन्या पुणे-मुंबईने द्रुतगती मार्गाने प्रवास करुन पहा म्हणजे टोलवाढ का केली? याचं उत्तर मिळेल.
शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुणे-मुंबई एक्सप्रेस वे मार्गाच्या टोल मध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार एप्रिल 2023 मध्ये टोलचे सुधारित दर1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. 2004 ला हा टोल सुरू करताना दर तीन वर्षांनी 18 टक्के दरवाढ करण्याचे ठरले होते. मात्र यामागचं गृहीतक होते की या रस्त्यावरील ट्रॅफिक दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढेल.
नवीन कंत्राट 2020 मध्ये झाले होते. त्यावेळी या सर्व बाबी विचारात घेऊन कंत्राट करणे आवश्यक होते. परंतु कंत्राट दहा वर्षांचे केले असल्याने आता त्यात बदल करणे शक्य नाही, असे सांगून शासन आणि प्रशासनाकडून दरवाढीचे समर्थन केले गेले. मात्र अजित पवार यांच्या वक्तव्याने आता ही दरवाढ अधिक स्पष्ट झाली आहे.
13 किलोमीटर अंतर कमी होणार
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एकूण 13 किलोमीटरच्या या मिसिंग लिंकमध्ये दोन बोगदे आणि दोन पूल उभारले जात आहेत या मिसिंग लेनमुळे पुणे-मुंबई अंतर पुढील वर्षी 13 किलोमीटरने कमी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दोन दिवसांपुर्वीच या प्रकल्पाला भेट देत पाहणी केली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सध्या लोणावळा ते खालापूर हे अंतर 19 किलोमीटर इतके आहे.या प्रवासादरम्यान बोरघाटात होणारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. ही कोंडी या मिसिंग लिंकमुळे फुटेल असा विश्वास सरकारला आहे.
असा आहे प्रकल्प
मुंबईच्या बाजूने, 6,600 कोटी रुपयांची ‘मिसिंग लिंक’ खोपोली येथून सुरू होते. 840-मीटर-लांब मार्गे (60 मीटर उंची) एक्स्प्रेस वेला बायपास करते. 1.75-किमी-लांब बोगद्यात प्रवेश करते, नंतर 640-मीटरच्या पुढे जाते. -लांब केबल-स्टेड ब्रिज (100 फूट उंची) आणि त्यानंतर आणखी 8.9-किमी-लांब बोगद्यात प्रवेश करतो. बोगद्याचा एक भाग जमिनीच्या 170 फूट खाली आहे आणि त्याच्यावर लोणावळा तलाव आहे, जो सिंहगड इन्स्टिट्यूटजवळ आहे.