कानपूर देहत (उत्तर प्रदेश) : बॅंडिट क्विन फुलदेवीच्या टोळीने चार दशकापुर्वी घडवलेल्या 20 जणांच्या बेहमाई सामुहिक हत्याकांडाच्या खटल्याची केस डायरी हरवली आहे. त्यामुळे या खटल्याची सुनावणी 24 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
विशेष न्यायाधिश (उप्र दरोडाग्रस्त क्षेत्र) सुधीर कुमार यांनी केस डायरी गहाळ झाल्याबद्दल न्यायालयीन अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. निकाल देण्याच्या दिवशी केस डायरी गहाळ कशी होते, असा सवाल करून ती न्यायासना समोर 24 जानेवारीपर्यंत हजर करण्याचे आदेश दिले.
उच्च जातीतील लालाराम आणि श्रीराम या दोघांनी केलेल्या बलात्काराचा बदला म्हणून फुलनदेवीने 1981 मध्ये उत्तर प्रदेशमशील बेहमाई गावातील 20 ठाकुरांची हत्या केली होती. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यावेळचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व्ही पी. सिंग यांनी पदाचा राजीनामा दिला.
या हत्याकांडातील 28 आरोपींपैकी 17 जण मरण पावले आहेत. त्यात फुलनदेवीचा समावेश आहे. त्यांची 2001 मध्ये हत्या करण्यात आली. त्या 11 वर्षे तुरूंगात काढल्यानंतर राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्या होत्या. त्या 1998 मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.