मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सात रुग्णांचे मृतदेह केईएम रुग्णालयाच्या शवागरात पडून आहेत. त्या रुग्णांचे नातेवाईक अद्याप न आल्याने मृतदेह शवागरात ठेवल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या रुग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे परंतु त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ न शकल्याने तसेच पोलिसांकडून आवश्यक ती परवानगी न मिळाल्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावणे पालिकेला अवघड झाले आहे. या सात मृतदेहांपैकी एकाचा मृत्यू तीन आठवड्यांपूर्वी झाला आहे. याबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी चर्चा करण्यात आला आहे. त्यांनी यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.