नवी दिल्ली – म्हैसूर संकुलातील बीईएमएलच्या इंजिन विभागात मुख्य रणगाड्यांसाठी भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या १५०० अश्वशक्तीच्या (एचपी) इंजिनची पहिली चाचणी आज घेण्यात आली. संरक्षण सचिव गिरिधर अरमाने यांच्या अध्यक्षतेखाली ही चाचणी घेण्यात आली.
हे १५०० एचपीच्या इंजिनमध्ये उच्च शक्ती – ते – वजन गुणोत्तर, समुद्र सपाटीपासून अधिक उंचीवर, उणे शून्य तापमानात आणि वाळवंटातील वातावरणासह अत्यंत टोकाच्या परिस्थितीतही कार्यक्षमता सिद्ध करणारे आहे. प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे इंजिन जागतिक स्तरावरील सर्वात प्रगत इंजिनांच्या तोडीचे आहे.
संरक्षण सचिवांनी यावेळी चाचणी कक्षाचे उद्घाटन केले. सशस्त्र दलांची क्षमता उंचावणारा हा परिवर्तनकारी क्षण असल्याचे ते म्हणाले.
या इंजिनच्या पहिल्या चाचणीने, तंत्रज्ञान स्थिरीकरणावर लक्ष केंद्रित करून, पहिल्या पिढीचे काम पूर्ण झाल्याचे सूचित केले आहे.
दुसऱ्या पिढीमध्ये लढाऊ वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, डीआरडीओच्या प्रयोगशाळेत विविध चाचण्यांसाठी बीईएमएल इंजिने तयार करेल आणि वापरकर्त्याच्या चाचणीसाठी वास्तविक वाहनांमध्ये त्यांचे एकत्रीकरण करेल. हा प्रकल्प ऑगस्ट २०२० मध्ये सुरु करण्यात आला आणि २०२५ च्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.