मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांच्या या चर्चेमुळे पुन्हा नव्या विषयाला तोंड फुटले आहे.
एका वाहिनीने केलेल्या दाव्यानुसार या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. मिलिंद नार्वेकर हे उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहायक असून ते उध्दव यांच्या खास मर्जितले मानले जातात. त्यांनी श्रीकांत शिंदेंशी चर्चा करण्याची गरज का पडली? अशी चर्चा सुरू असून नार्वेकरही आता शिवसेनेला धक्का देणार का, याकडे लक्ष दिले जाते आहे.
उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्याची हाक दिल्यास जाणार का? विचारताच एकनाथ शिंदे यांनी तडक सांगितलं…
ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारला होता. त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंशी चर्चा करण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांनाच सूरतला पाठवले होते. मात्र, तिथे जाऊन आणि चर्चा करुन नार्वेकरांना काही यश आले नव्हते.
एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर हे सुरुवातीपासूनच एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. या दोघांचेही पक्षातील सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. अशावेळी हे दोन्ही पुन्हा जवळ आल्यास उद्धव ठाकरे यांना खूप मोठा धक्का बसू शकतो. मात्र, सध्या तरी याबाबत फक्त राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. पण मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंपासून दूर झाल्यास त्यांना मोठा धक्का बसू शकतो.
अमृता फडणवीस म्हणाल्या,’मी ठाकरे कुटुंबाला एवढंच सांगेन की, सक्षम लोक…’
दरम्यान, आतापर्यंत शिवसेनेत जी काही बंडं झाली त्या-त्यावेळच्या नेत्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आपण शिवसेना सोडत असल्याचं म्हटलं होतं. पण आता तेच मिलिंद नार्वेकर हे स्वत: तर बंडखोरीच्या तयारीत नाही ना? असा सवाल या सगळ्या घडामोडीनंतर अनेक जण विचारत आहेत.