पर्थ : भारतीय महिला संघाने सलामीच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा पराभव करत आपल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अभियानाची विजयी सुरूवात केली. त्यानंतर स्पर्धेतील साखळी फेरीतील दुस-या सामन्यात भारतीय संघासमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे.
पर्थ येथील वाका मैदानावर सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी बांगलादेश संघाने टाॅस जिंकला असून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास फलंदाजीस पाचारण केलं आहे.
#TeamIndia will bat first against Bangladesh in their second #T20WorldCup encounter.💪🏻
Smriti Mandhana is out due to viral fever, Richa Ghosh replaces her. #INDvBAN
Follow it live 👉👉 https://t.co/uJ2BiRWmFP pic.twitter.com/5NJLkYSDDZ
— BCCI Women (@BCCIWomen) February 24, 2020
दरम्यान, भारत-बांगलादेश संघ एकूण ११ वेळा टी-२० क्रिकेटमध्ये आमनेसामने आले असून यात भारतीय संघाने ९ वेळा तर बांगलादेशने २ वेळा बाजी मारली आहे.