सिडनी : दिप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियासमोर विजयासाठी १३३ धावांचे आव्हान ठेवले आहे.
In the #T20WorldCup opener, #TeamIndia have set a total of 132-4 on the board. 💪
Time for the bowlers to defend the target. #AUSvINDFollow it live 👉👉 https://t.co/2nh7zowHqX pic.twitter.com/Y71nDgcC5B
— BCCI Women (@BCCIWomen) February 21, 2020
आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना करताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले होते. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने शफाली वर्माच्या १५ चेंडूत २९, जेमिमा राॅर्ड्रिगेजच्या २६(३३) आणि दीप्ती शर्माच्या नाबाद ४९(४६) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या.
याशिवाय सलामीवीर स्मृती मानधना हिने १०(११), हरमनप्रीत कौरने २(५) आणि वेदाने नाबाद ९(११) धावांची खेळी केली.
आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत जेस जोनासेन हिने सर्वाधिक २ तर एलिसे पैरी आणि डेलिसा किमिंसे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.