मुंबई: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा यासाठी आंध्र प्रदेश राज्यात ‘दिशा’ कायदा लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हेगाराला २१ दिवसात फाशी देऊन पीडितेला न्याय मिळवून देणारा दिशा कायदा लवकरच महाराष्ट्रातही आणणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
या कायद्याची सखोल माहिती घेण्यासाठी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ गृहमंत्र्यांसह हैद्राबादला गेले होते. या पथकाचे नेतृत्व आय जी श्रीमती. दोरजे करणार असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. त्यांच्याकडून सविस्तर अहवाल आल्यानंतर येत्या अधिवेशनात या कायद्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन दिशा कायदा अमलात आणू, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.