T20 World Cup 2024, Virat Kohli : विराट कोहलीला गेल्या दशकातील क्रिकेट जगतातील महान खेळाडू म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तो लवकरच आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहे, परंतु यावेळी त्याच्या T20 विश्वचषक संघात समावेश होण्याची फारशी आशा दिसत नाही.
T20 विश्वचषक 2024, जो IPL संपल्यानंतर फक्त एका आठवडयानंतर सुरू होईल. कोहली हा पॉवर हिटर नाही ए किंवा सूर्यकुमार यादव सारखे अनोखे शॉट्स तो खेळू शकत नाही, परंतु डावाची रचना करण्याची त्याची क्षमता आणि त्याच्या फलंदाजीतील क्लास (शैली) त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवते.
विराट कोहली का खास आहे?
विराट कोहलीने आतापर्यंत 117 टी-20 सामन्यांच्या 109 डावांमध्ये 4,037 धावा केल्या आहेत. T20 क्रिकेटमध्ये 50 च्या सरासरीने धावा करणे ही सामान्य गोष्ट नाही आणि कोहलीची 51.76 ची सरासरी त्याला खरोखरच असामान्य बनवते. त्याला उगीच कोणत्याही कारणासाठी चेस मास्टर म्हटले जात नाही, आकडेवारी दर्शवते की T20 सामन्यांमध्ये पाठलाग करताना त्याची सरासरी 71.85 आहे आणि कोहली खेळत असताना भारतीय संघ जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आहे, तेव्हा भारतीय संघाने 46 पैकी 40 वेळा विजय मिळवला आहे.
कोहलीची आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे टी-20 विश्वचषक संघात निवड होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. पंरतु कोहली असा खेळाडू आहे जो मधल्या षटकांमध्ये चौकार-षटकार न आल्यास एकेरी आणि दुहेरीसह धावफलक चालू ठेवतो. त्यामुळेच तो विरोधी कर्णधारांसाठी मोठा धोका आहे.
त्याच वेळी, कठीण परिस्थितीत, कोणत्याही मजबूत फलंदाजाप्रमाणे तुफानी खेळी कशी खेळायची हे त्याला चांगले ठाऊक आहे. गेल्या काही सामन्यांमध्येही, त्याने उच्च स्ट्राइक रेटने धावा केल्याचे समोर आले आहे कारण मागील 14 T20 सामन्यांमध्ये त्याचा एकूण स्ट्राइक रेट 146.31 आहे. हे तथ्यही कोणापासून लपलेले नाही की जास्त चेंडू खेळल्यासोबत कोहलीचा स्ट्राईक रेटही वाढतच जातो. केवळ वेगवानच नाही तर फिरकी गोलंदाजांविरुद्धही चांगल्या धावा कशा करायच्या हे त्याला माहीत आहे.
T20 World Cup 2024 : विराट कोहली T20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत कीर्ती आझाद यांचे मोठे वक्तव्य…
आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम आहे. विराटने आपल्या आयपीएल कारकिर्दित एकूण 237 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 7 हजार 263 धावा केल्या आहेत. यामध्ये 7 शतक आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये नियमितपणे मोठ्या इनिंग्स खेळल्यामुळे विराट कोहली क्रिकेटच्या या फॉरमॅटसाठी एक आदर्श बॅट्समन बनतो या सर्व बाबींवरून कोहली आता भारतीय संघाची गरज बनला आहे हे स्पष्ट आहे. आणि म्हणून आणि आगामी टी-20 विश्वचषकासाठीची टीम इंडिया विराटशिवाय अपूर्ण आहे.