नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या कार्यकाळातला सर्जिकल स्ट्राईकचा दावा खोटा आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. जावडेकरांनी म्हटले की, एका माहिती अधिकारात 2016 पूर्वी कुठलाच सर्जिकल स्ट्राईक झाला नसल्याचे उघड झाले आहे. तसेच कॉंग्रेसचे अजून एक खोटे उघडकीस आले असेही जावडेकर म्हटले.
कॉंग्रेसने संपुआ काळात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची एक यादी जाहीर केली होती. तसेच राजकीय फायदा मिळवण्यासाठी सैनिक कारवाईंचा आपण वापर केला नसल्याचे पक्षाने म्हटले होते. कॉंग्रेस आधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत होती आणि आता सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा करत आहे.
एका माहिती अधिकारात सैन्याने सांगितले की, 2016 पूर्वी कुठलेच सर्जिकल स्ट्राईक झाले नव्हते. कॉंग्रेसचे अजून एक खोटे समोर आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, संपुआ सरकारच्या काळात अनेक सर्जिकल स्ट्राईक केले गेले. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.