श्रीगोंदा (शहर प्रतिनिधी) – तालुक्यातील तांदळी येथे शेतात ऊसतोड करणार्या मजुराच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दिनकर शंकर चव्हाण (रा. तळवण तांडा, भडगाव, जि. जळगाव) हे भाऊ व पत्नीसह तांदळी येथे मागील दोन महिन्यांपासून शेतामध्ये पाल टाकून राहात होते. दिनकर यांच्या घरात किरकोळ वाद झाले. दोघे भाऊ ऊसतोडणीसाठी शेतात गेले.
मात्र, कामासाठी पत्नी सुरेखा का आली नाही, हे पाहण्यासाठी अकरा वाजता दिनकर पालावर गेला.
पालात सुरेखा जमिनीवर पडलेली आढळली. काहीतरी विषारी औषध प्याल्याचा त्याला संशय आला. दिनकरने पत्नी सुरेखाला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीत ती मृत असल्याचे सांगितले. शवविच्छेदन झाल्यावर मृत महिलेस अंत्यविधीसाठी तिच्या गावी तळवण तांडा येथे नेण्यात आले.