नवी दिल्ली – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नमाज संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, नमाज पठण केले पाहिजे, पण दुर्दैवाने काही लोकांना वाटते की त्यातून ताकद दाखवली जाते. अशाप्रकारे कोणाला नमाज पठण करायचे असेल तर त्यांनी प्रथम प्रशासनाशी चर्चा करावी. अशा कार्यक्रमांसाठी सर्व धर्मांचे नियम आधीच तयार करण्यात आले आहेत. असे विधान त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, नमाज हा विषय केवळ काही लोकांसाठी ताकद दाखवण्यासारखा आहे, असे मनोहर लाल खट्टर यांनी म्हटले.
दरम्यान, गुरुग्राम जिल्हा प्रशासनाने ३७ पैकी आठ नियुक्त ठिकाणी नमाज पठण करण्यास आधीच बंदी घातली आहे. त्याचबरोबर नमाजासाठी मशिदी आणि इदगाह असताना सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करण्याची गरज नसल्याचेही सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.