नवी दिल्ली – वर्ष १९७९ ची निवडणूक गाजली होती ती तत्कालीन पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर केलेल्या बेलगाम आरोपांनी. भुवनेश्वर आणि लखनौ येथील जाहीर सभांमध्ये बोलताना, चरणसिंग म्हणाले होते की, इंदिरा गांधींनी त्यांच्या स्विस बॆंकेच्या खात्यातून ६० कोटी रुपये काढले होते. हे पैसे वापरुन इंदिरा गांधींनी निवडणुकीच्या वेळी १० हजार जीप खरेदी केल्या आणि संजय गांधींनी त्यातील बरिचशी रक्कम प्रचारासाठी वापरली होती. ( Story of 1979 Lok Sabha)
त्यावेळी या प्रकरणावरून देशात आणि परदेशात मोठा वाद निर्माण झाला होता. केवळ भारतीय राजकीय वर्तुळातच नाही तर स्वित्झर्लंडच्या संसदेतही याविषयी बराच गदारोळ झाला होता. ३१ डिसेंबर १९७९ रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार,चौधरी चरण सिंह यांनी भुवनेश्वरमधील भाषणादरम्यान इंदिरा गांधींच्या स्विस खात्यातून पैसे काढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
यानंतर भारत सरकारने स्विस अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली. तथापि, अधिकार क्षेत्रातील गुंतागुंतीमुळे निधीचा मागोवा घेणे अत्यंत आव्हानात्मक बनले. यापूर्वी ४० कोटी रुपये काढण्यात आल्याचे उघड झाले होते. मात्र नंतर खरी रक्कम ६० कोटी रुपये असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर या संदर्भातील तपासाला वेग आला होता.
लखनौमधील हजरत महल पार्क येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना चरणसिंग यांनी इंदिरा आणि संजय गांधी यांनी निवडणुकीसाठी दहा हजार जीप खरेदी करण्यासाठी वापरलेल्या निधीच्या स्रोतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा हा वाद आणखी वाढला. त्यांनी मुंबईत परकीय पैशाचा प्रवाह अधोरेखित केला आणि तो कोठून येत आहे आणि निवडणुकीच्या अखंडतेवर होणारा परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली होती. आजही या आरोपांबाबत वास्तव माहिती मिळत नाही, हे विशेष.