प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 26 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) मे महिन्यात घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा-2021 या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात एकूण 1 हजार 279 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.
आयोगामार्फत 7 ते 9 मे 2022 रोजी राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकालासह कटऑफही आयोगाने शुक्रवारी प्रसिद्ध केला आहे. मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात येत आहे. मुलाखतीस पात्र उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एकूण 1279 उमेदवारांपैकी पुणे विभागीय केंद्रातून मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची सर्वाधिक असून, त्याची संख्या 903 इतकी आहे.
त्यानंतर औरंगाबाद केंद्रातून 113, नागपूर 87, नाशिक 77, मुंबई 75 आणि अमरावती केंद्रातून 24 उमेदवार पात्र ठरले आहेत. गुणांचा कटऑफ आणि पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या परीक्षेत पात्र न ठरलेल्या उमेदवारांना गुणांची पडताळणी करावयाची असेल, त्यांनी दहा दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले