बारामती, (प्रतिनिधी) – वर्ग भरला, परीक्षा झाली आणि निकालही लागला. भविष्याच्या वाटा शोधणारी पोर १७२९ आचार्य अॅकॅडमीच्या शिक्षणाच्या वारीत रंगली आणि करियरच कोड सुटल्याच हसू त्यांच्या चेहऱ्यावर फुलले. हे चित्र होत सातारा येथे रंगलेल्या १७२९ आचार्य अॅकॅडमीच्या शिक्षणाच्या वारीतील.
करियर कसे निवडावे हे सांगण्यापासून सुरू झालेला हा कार्यक्रम मॅथ्स, केमिस्ट्री, फिजिक्स,बायोसारखे विषय प्रत्यक्ष तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून हसतखेळत शिकण्यापर्यंत पोचला, यासोबतच विद्यार्थ्याची लेखी परीक्षाही घेतली गेली.
या परीक्षातील गुणांच्या आधारे काही मुलांना स्कॉलरशीपही जाहीर झाल्या. विद्यार्थी आणि पालकही बोलते झाले. शनिवारी (दि. ४ )रोजी साताऱ्यात स. १० ते संध्या. ५ असा हा दिवसभराचा उपक्रम पार पडला.
१७२९ आचार्य अॅकॅडमीने विद्यार्थ्यांना करियर कसे निवडावे, कोणकोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत, याचसोबत जेईई, नीट आणि एनडीएसाठी विशेष मार्गदर्शन देणारा शिक्षणाची वारी हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत विविध शहरात जाऊन तेथील विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले केले जाते. याला विद्यार्थी आणि पालकांचा उर्स्फूत प्रतिसाद मिळाला.
अॅकॅडमीचे संचालक प्रवीण ढवळे यांनी यावेळी केमिस्ट्रीमधील कठीण वाटणाऱ्या संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. प्रत्येक पिढीत शिक्षणाचा पॅटर्न बदलत चालला आहे, त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी हा बदलाची माहिती घेऊन पुढील दिशा ठरवणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ईकीगाई संकल्पनेच्या आधारे करियर निवडताना आपली आवड, समाजाची गरज, उत्पन्नाचे साधन आणि मिळणारे समाधान या घटकांचा विचार करावे, असे यावेळी शिक्षणाची वारी उपक्रमाचे समन्वयक निलेश बनकर यांनी सांगितले.
यासोबत विविध क्षेत्रातील करीयरच्या संधींची माहितीही त्यांनी दिली. १७२९ आचार्य अॅकॅडमीचे शिक्षक ओजस तुंबडे यांनी फिजिक्समधील विषयावर मार्गदर्शन केले.
समर्थ पानसरे यांनी मॅथ्समधील तर निकिता रामदासी यांनी बायोमधील मुलभूत संकल्पनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोहित महाजन यांनी या उपक्रमाचे नियोजन केले. उर्त्कषा फरांदे, शुभांगी भापकर यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी बहुमोल सहकार्य केले तर आभारप्रदर्शन घनश्याम केळकर यांनी केले.