नवी दिल्ली – करोनाचे सावट असतानाही खेळाडूंनी आपला सराव सुरू ठेवावा असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) सांगत असली तरी सध्या कोणत्या स्पर्धा नाहीत, तसेच सराव शिबिरेही बंद केलेली आहेत, मग खेळाडूंनी सराव करायचा कुठे व कसा असा प्रश्न विचारत भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप याने केला असून आयओसी विनोद करण्याच्या मुडमध्ये आहे का असा टोलाही त्याने मारला आहे.
टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या खेळाडूंनी करोनाची भीती न बाळगता आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करावे. आयओसी असे प्रोत्साहन देत असली तरी त्यात मला स्वारस्य वाटत नाही. सरकारने सराव केंद्रे बंद केली आहेत, मग खेळाडूंनी वैयक्तिक पातळीवर सराव कुठे आणि कसा करायचा हा मला प्रश्न पडला आहे.