पानशेत – वेल्हे तालुक्यातील पानशेत जवळील रुळे येथे नुकतीच आधुनिक पद्धतीने आठ आणि चार ओळींच्या यंत्राद्वारे करण्यात आली. कृषी विभागाच्या वतीने येथील शेतकरी राम हळंदे यांच्या शेतात ही प्रात्यक्षिके करून या भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा कृषी अधिक्षक बी. जी. पडघडमल, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी अनिल देशमुख, आदर्श शेतकरी अनंता निवंगुणे, जिल्हा परिषदेचे सदस्य अमोल नलावडे, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष घाडगे, प्रदीप औताडे तसेच या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारचा कृषी विभाग (आत्मा) आणि औताडे ट्रॅक्टर यांच्या वतीने करण्यात आले होते.
पानशेत हा अतिशय पावसाचा भाग आहे. येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे भात आहे. भाताची लावणी करण्यास खूप वेळ लागतो. मात्र, अशा यंत्रामुळे हे काम सोपे झाले आहे, असे अमोल नलावडे यांनी सांगितले.
पडघडमल म्हणाले की, या पुढील काळात भात लावणीसाठी प्रोत्साहन दिले जाईल. त्यांना 90 टक्के तर व्यक्तिगत भात लावणीसाठी 75 टक्के अनुदान शासनाकडून दिले जाईल. या तालुक्यात 500 ते 600 एकर क्षेत्रांमध्ये भात लावणीचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. अनिल देशमुख यांनी हा संपूर्ण तालुका दत्तक घेऊन या भागातील मागास शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजन अनंता निवंगुणे यांनी केले होते.