– प्रा. डॉ. सुभाष राठोड
आज जागतिक बंजारा दिवस. त्यानिमित्ताने भारतातील व जगभरातील बंजारा समाजाच्या सद्यस्थितीबाबत टाकलेला एक दृष्टिक्षेप…
8 एप्रिल 1981 रोजी जर्मनीमध्ये रोमा, जिप्सी आणि विश्व बंजारा समाजाची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये भारताकडून रामसिंगजी भानावत आणि रणजीत नाईक यांनी भाग घेतला होता. बंजारा समाजाची एकता आणि रोमा बंजारा बांधवांच्या प्रश्नांकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने रोमा समुदायाविषयी भेदभाव नष्ट व्हावा व मानवाधिकाराचे होणारे हनन थांबावे, मानवाधिकाराचे संरक्षण कवच मिळावे, त्यांनासुद्धा सन्मानाने जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार मिळावा, इत्यादी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दरवर्षी 8 एप्रिल हा दिवस ‘जागतिक रोमा बंजारा दिवस’ म्हणून साजरा करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.
रोमा बंजारा बांधव हे भारताचे मूळ रहिवाशी असून ते मूळचे गोर बंजारा समुदायाशी निगडित आहेत. 6व्या शतकापासून ते 11व्या शतकापर्यंत ते भारतातून अफगाणिस्तानमार्गे युरोपमध्ये गेले असल्याचे मानले जाते. युरोपमधील विविध देशांत रोमा बंजारा समाजाची लोकसंख्या दोन कोटीपेक्षाही अधिक असल्याचे यावेळी समजले. रोमानी भाषा भारतीय इंडो-आर्यन भाषा कुळातील असून बंजारा, गुजराती, राजस्थानी यांसारख्या इंडो-आर्यन भाषा कुळातील भारतीय भाषांशी कमालीचे साधर्म्य आढळून येते. ‘रोमा बंजारा कल्चरल सेंटर’, उदयपूर, राजस्थानच्या संस्थापिका अनिशा हरनॅक्स या स्वतःजिप्सी, रोमानी समुदायाच्या असून त्यांनी संशोधनाअंती जिप्सी समुदायाचे मूळ उत्तर-पश्चिमी भारत असल्याचे मत मांडले आहे. त्यांनी रोमानी समुदायाची संस्कृती भारतीय असून त्यांच्या बोलीभाषेत राजस्थानी, पंजाबी, गुजराती शब्दांचा भरणा अधिक असल्याचे नमूद केले आहे.
’उशपींशी ऋेी डशर्लीश्ररी Aरपव चेश्रळर्लीश्रशी इळेश्रेसू खपीींर्ळींीींळेप, कूवशीरलरव’ या संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निरज रॉय यांच्या नेतृत्वाखाली जगातील अनेक विश्वविद्यालयाच्या सायंटिस्टनी पूर्व युरोपमधील रोमा लोकांची डीएनए चाचणी केली असता त्यांचे डीएनए भारतीय बंजारा, शिकलीगार या समाजाशी साम्य असल्याचे आढळले होते. युरोपमधील रोमा बंजारा लोकांनी नाझीकडून (हिटलर) 1938 मध्ये ‘जिप्सी क्लिनअप विक’ राबविण्यात आले. दुसर्या महायुद्धाच्या काळात या समाजाला लक्ष्य करण्यात आले होते. युद्धकाळात त्यांना विशिष्ट शिबिरामध्ये कैदेत ठेवण्यात आले. स्त्रिया, बालके तसेच माणसे यांना नामोहरम करण्यात आले होते. उपासमार आणि भूकबळीमुळे सुमारे 20 हजार रोमा बंजारा मृत्यूमुखी पडल्याची वस्तुस्थिती जगासमोर आली होती.
आज ‘रोमा बंजारा’ हा युरोपमधील सर्वाधिक गरीब, अल्पसंख्याक समुदाय आहे. हे लोक भटके असल्यामुळे इंग्रजीमध्ये यांना ‘जिप्सी’ म्हणतात. युरोपमध्ये या लोकांना नागरिकत्व प्राप्त करण्यात अनंत अडचणी येत असून वांशिक भेदभाव केला जातो. त्यांचे मानवाधिकार नाकारले जात आहेत. फ्रान्सने गेल्या काही वर्षांपूर्वी रोमा लोकांना रोमानिया आणि बल्गेरियामधे हुसकावून लावले होते. हा मुद्दा फ्रान्समधील काही मानवाधिकार संघटनांनीसुद्धा लावून धरला होता. या समुदायाच्या मानवाधिकार रक्षणासाठी ’र्एीीेशिरप ठेार ठळसहींी उशपींशी ’(एठठउ) तसेच ’ठेार ठळसहींी छशींुेीज्ञ’ या स्वयंसेवी संस्था युरोपमधे कार्यरत आहेत. युरोपमधे गेल्यानंतर रोमा समुदाय युरोपातील बायजेंटाइन साम्राज्याचा एक भाग बनले. हा समुदाय स्वत:ला रोमन साम्राज्याचे वारसदार मानतात, म्हणून या लोकांनी स्वत:ला ‘रोमा’ हे नाव धारण केले असे मानले जाते.
1983 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी रोमा महोत्सवात ‘रोमा लोगों का इतिहास विपत्ति और वेदना का इतिहास है, लेकीन नियत्ती की थप्पेडोपर मानवीय उत्साह का परिचायक है’, असे उद्गार काढले होते. तसेच भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी एका ठिकाणी भारतीयांच्या सांस्कृतिक विविधतेबाबत असे विशद केले आहे की, ‘कोई विदेशी जो भारतसे बिल्कुल अपरिचित हो, वह एक सैरसे दुसरे सैरतक सफर करे तो उसको इस देशमें इतनी विभिन्नताएं देखने को मिलती है कि, वह कह उठेगा- यह एक देश नहीं बल्कि कहीं देशों का एक समूह है। पर विचार करके देखा जाए तो इस विभिन्नताओं की तह में एक ऐसी एकता फैली हुई है, जो अन्य विभिन्नताओंको ठीक उसी तरह पिरोलेती है और पिरोकर एक सुंदर मणियों की समूहमाला बना देतीहै।’
रोमा बंजारा समाज युरोपमधे आजही खूप कष्टप्रद जीवन जगतो आहे. रोमा समुदायाविषयी आपल्या देशातील बंजारा बांधवांमधे अधिक जागरुकता झाली पाहिजे. रामसिंग भानावत यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अनेकदा या समाजाच्या मानवाधिकाराबाबत प्रयत्न केले होते. बंजारा समाज भारतात आणि परदेशातही राहतो. हा समाज जगात ‘रोमा बंजारा’, युरोपात ‘जिप्सी बंजारा’ अशा अनेक नावांनी ओळखला जातो, तर भारतात गोर बंजारा, बामणिया बंजारा, गवारिया, लदनिया बंजारा, बालदिया, चारण, बाजीगर, लभाणी, लम्बाडा, सुगळी, सिरकीबंद अशा अनेक नावांनी ओळखला जातो. एकाच विशाल अशा समाजाची भारतात राज्यपरत्वे जवळपास 44 वेगवेगळी नावे आढळून येतात आणि ही नावे समाजाच्या एकतेमध्ये, प्रगतीमध्ये अडसर ठरत आहेत.
गोर-बंजारा हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा एक महत्त्वाचा घटक होय. भारतीय विविधतेतील एक स्वतंत्र संस्कृती जोपासणारा समाज म्हणून बंजारा समाजाकडे पाहिले जाते. काटक, लढवय्ये, साहसी व निसर्गप्रेमी अशी त्यांची खरी ओळख आहे. गोर बंजारा समाजाच्या अस्तित्वाच्या खानाखुणा, पाळेमुळे आपणास भारतातील एक सभ्य संस्कृती म्हणून समजल्या गेलेल्या सिंधू संस्कृतीमध्ये सापडतात. त्यांच्या संस्कृतीची नाळ ही सिंधू संस्कृतीशी जुळलेली पाहावयास मिळते.