चिंबळी- परिसरात गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे या भागातील पिकांची वाढ खुंटली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी विहिरीचे पाणी देऊन विविध पिकांची चांगल्या प्रकारे निगा राखली.
त्यामुळे या परिसरात सोयाबीन पीक जोमात येऊन शेतीचा परिसर हिरवागार झाला आहे; परंतु आता या पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे.
या पिकाची गेल्या पंधरा दिवसांपूर्वी खुरपणी, खत पाणी व औषध फवारणीसाठी सुमारे 25 हजार रुपये खर्च आला आहे; परंतु पावसाने दडी मारल्याने वाढ खुंटली आहे, असे निघोजे येथील प्रगतीशील शेतकरी शांताराम येळवंडे यांनी सांगितले.