नवी दिल्ली: आणखी 80 वर्षांनी म्हणजे 2100 पर्यंत भारताची लोकसंख्या कमी होउन शंभर कोटी असेल असे नव्याने सांगण्यात आले आहे. प्रजनन दर घटल्याने असे होईल असेही यावेळी नमूद करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. केवळ भारतच नव्हे, तर जगातील अन्य देशांचीही लोकसंख्या या काळात घटणार असून जगाची लोकसंख्या दोनशे कोटी
म्हणजे दोन अब्जने कमी होईल. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला असून तो द लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिध्द झाला आहे.
गेल्या 70 वर्षांपासूनच भारताच्या एकूण प्रजनन दरात घट होत आली आहे. 1950 मध्ये प्रजनन दर 5.6 टक्के होता. याचा अर्थ एक महिला सरासरी 5 ते सहा मुलांना जन्म देऊ शकत होती. 2017 मध्ये हा दर 2.14 टक्क्यांपर्यंत खाली घसरला. त्यानुसार 2100 पर्यंत भारतातील प्रजनन दर कमी होत 1.29 टक्क्यांपर्यंत खाली घसरेल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
त्यामुळे या सहस्त्रकाच्या अखेरीत भारताची एकूण लोकसंख्या 30 कोटींनी कमी झाली असेल असे म्हटले जात आहे.
2017 पर्यंतच जागतिक स्तरावर प्रजनन दरात घट नोंदवली गेली होती. त्यावेळी हा दर 2.14 टक्के नोंदवला गेला होता. मात्र 2100 साल उजाडेपर्यंत हा दर त्यापेक्षा कमी म्हणजे 1.7 टक्के इतकाच असेल असे हा अहवाल सांगतो.
सध्या जगाची लोकसंख्या 7.8 अब्ज आहे. 2064 पर्यंत त्यात 9.7 अब्जपर्यंत वाढ होण्याचा अनुमान आहे. त्यानंतर मात्र लोकसंख्येत घसरण होण्यास सुरूवात होईल व 2100
उजाडेपर्यंत ती 8.8 अब्जवर स्थिरावेल. 2100 सालापर्यंत जगाची लोकसंख्या किमान 10.9 अब्जपर्यंत पोहोचेल असा अंदाज काही काळापूर्वी संयुक्त राष्ट्रांकडून वर्तवण्यात आला होता.
भारताची लोकसंख्या सगळ्यांत जास्त 80 वर्षांनी भारताची लोकसंख्या 30 कोटींनी घसरण्याचा अंदाज बांधला जात असला तरी सर्वाधिक लोकसंख्येसह भारतच पहिल्या स्थानावर असणार आहे. त्यानंतर नायजेरिया दुसऱ्या क्रमांकावर तर तिसऱ्या क्रमांकावर चीन असेल.
आज चीनची लोकसंख्या सगळ्यांत जास्त असून आगामी चार वर्षांत त्यांची लोकसंख्या 1.4 अब्ज असेल असा अंदाजही अहवालात वर्तवण्यात आला आहे. 2100 साल उजाडेपर्यंत
चीनची लोकसंख्या 73 कोटीपर्यंत खाली येईल असेही नमूद करण्यात आले आहे.