मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ‘सुषमा अंधारे’ हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वकृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांच्या भाषणांना मुळे शिवसेनेला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाता आहे. मात्र सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत
दरम्यान, आपण केलेल्या या व्यक्तव्यावर काही दिवसांपूर्वी स्वतः सुषमा अंधारेंनी देखील प्रतिक्रिया देत माफी मागितली होती. “माझे जुने व्हिडीओ व्हायरल केले जातात, मग हे लोक मधले 10 ते 15 वर्ष हे कुठे गेले होते? आधी मी भाष्य केलं असलं तरीही त्यामागील लॉजिक समजून घेतलं पाहिजे. माझ्यासाठी माझा पक्ष महत्त्वाचा आहे. मात्र, माझ्या बोलण्याने वारकरी संत संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागण्यात गैर वाटत नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.
परंतु, वारकऱ्यांमध्ये अद्यापही रोष असून अंधारेंविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनी भाजपवर घणाघात केला आहे. ‘माझी क्लिप म्हणजे भाजपचे षडयंत्र असून आंदोलन करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत’, असे त्यांनी म्हंटले आहे.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, “माझी क्लिप म्हणजे भाजपचे षडयंत्र. खरा वारकरी वाद घालण्याचे अमंगल काही करणार नाहीत. आंदोलन करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत. पंधरा वर्षानंतर ती क्लिप व्हायरल केली. कारण, आता काही प्रश्न विचारले जातात. त्याचे उत्तर त्यांना देता येत नाहीत.’ असं त्या म्हणाल्या आहेत.