मुंबई – केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे काल अनलॉकचा चौथा टप्पा जाहीर करण्यात आला. याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये, ३० सप्टेंबपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. याचाच आधार घेत राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी, परिक्षा घ्यायच्या कशा असा प्रश्न केंद्र सरकार व विद्यापीठ अनुदान आयोगाला केला आहे.
तत्पूर्वी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत सर्वोच्च न्यायालयाने, राज्य परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला होत्ता.
अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत राज्य सरकार व युजीसी दरम्यान मतमतांतरे असल्याने अखेरीस हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. यानंतर न्यायालयानं परिक्षा घ्यायचा आदेश दिल्याने राज्य सराकरने तशी तयारीही दर्शवली.
मात्र, काल (शनिवारी) केंद्र सरकारने अनलॉकचा चौथा टप्पा जाहीर केला. यामध्ये ३० सप्टेंबरपर्यंत शाळा बंद ठेवाव्यात असा आदेश काढण्यात आला. नेमका हाच धागा पकडून राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्राला सवाल केला आहे.
उदय सामंत यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करताना, “केंद्र सरकार म्हणते ३० तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लॉकडाउन मुळे बंद राहणार ..यूजीसी म्हणते 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या ..राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय ..30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा.” असं ट्विट केलं आहे.
केंद्र सरकार म्हणते 30 तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लोक डाऊन मुळे बंद ..यूजीसी म्हणतy 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या ..राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय ..30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा. pic.twitter.com/ZcePitfl6T
— Uday Samant (@samant_uday) August 30, 2020