ED arrest kejariwal : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे की निवडणूक रोखे घोटाळा हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे आणि केंद्रातील भाजप सरकारने यावरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे.
नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात रविवारी येथे सीपीआय(एम) ने आयोजित केलेल्या रॅलीला संबोधित करताना विजयन यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि संघ परिवार संविधानाची पायमल्ली करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला. | ED arrest kejariwal
संघ परिवार घटनात्मक संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असून देशाच्या न्यायव्यवस्थेलाही धोका निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक रोखे घोटाळ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश भाजप सरकारसाठी हानिकारक होता. त्यामुळे त्यांना या विषयावरून जनतेचे लक्ष हटवायचे होते आणि त्यासाठीच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे.असे विजयन म्हणाले. | ED arrest kejariwal
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जेव्हा निवडणूक रोख्यांची कल्पना मांडण्यात आली तेव्हा सीपीआय(एम) ने हे भ्रष्टाचाराचे हत्यार असल्याने त्याला विरोध केला आणि त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती असेही त्यांनी नमूद केले. निवडणूक बाँड घोटाळा हा भारतातील आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे.
अशा उघड भ्रष्टाचारात गुंतण्याची हिंमत त्यांना कशी आली? भाजपला वाटले की त्यांची कधीच चौकशी होणार नाही,पण आता सत्य जगापुढे आले आहे असे ते म्हणाले. केजरीवाल यांच्या अटकेमुळे संघ परिवार कायद्याच्या वर आहे आणि त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी आम्ही काहीही करू, असा संदेश देण्याचा प्रयत्न संघ परिवार करत असल्याचा आरोप विजयन यांनी केला. विजयन यांनी सीएएबाबत काँग्रेसच्या भूमिकेवरही हल्लाबोल केला. | ED arrest kejariwal