Arvind Kejriwal| दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 21 मार्चला संध्याकाळी अटक केली आहे. सध्या देशात लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. अशातच त्यांना अटक केल्याने विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. यातच आता जेलमध्ये केजरीवाल यांना संपविण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
केजरीवाल यांचे इन्सुलिन पातळी सातत्याने वाढत आहे. मात्र त्यांना इन्सुलिनचा डोस दिला जात नाही. तुरुंगात केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात असून त्यांना संथपणे मृत्यूच्या दारात ढकलले जात आहे, असा दावा सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.
सौरभ भारद्वाज काय म्हणाले? Arvind Kejriwal|
दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज (यांनी मोदी सरकार आणि एलजी विनय कुमार सक्सेना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सौरभ भारद्वाज म्हणाले की, केजरीवाल यांची साखरेची पातळी खूप वाढली आहे. त्यामुळे ते वारंवार इन्सुलिनची मागणी करत आहेत, मात्र त्यांना सुविधा दिली जात नाही. डीजी आणि डीआयजींकडेही इन्सुलिनची मागणी केली. मात्र, त्यांनीही इन्सुलिन देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. याउलट केजरीवाल खोटे बोलत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.”
एलजी विनय कुमार सक्सेना यांच्यावर निशाणा साधत सौरभ भारद्वाज म्हणाले की, “आपल्या डॉक्टरांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणीला जेल प्रशासन कथितपणे विरोध करत आहे. अरविंद केजरीवाल यांची किडनी निकामी झाली तर ते परत देऊ शकतील का? तुम्ही त्यांचे यकृत ठीक करू शकत नाही. दोन-चार महिन्यांनंतर केजरीवाल तुरुंगातून बाहेर येतील, तेव्हा त्यांचे अनेक अवयव खराब होतील, असा कट रचला जात आहे.”
आतिशी यांचे ट्वीट आतिशी
आप नेत्या आतिशीने सीएम केजरीवाल यांच्या आरोग्याचा अहवाल सोशल मीडियावर शेअर केला आहे. अहवाल शेअर करताना त्यांनी लिहिले की, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या १२ एप्रिल ते १७ एप्रिलदरम्यान साखरेच्या पातळीचे हे रिपोर्ट आहे. इतक्या उच्च साखरेच्या पातळीवर इन्सुलिन न दिल्यास व्यक्तीचे हळूहळू अवयव निकामी होतात. हे क्रूर सरकार मधुमेही रुग्णांना इन्सुलिन देण्यास नकार देत आहे,” असे त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा:
विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणार; प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना