काठमांडू: नेपाळची डावखुरी फिरकी गोलंदाज अंजली चंद हिने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये विक्रमाची नोंद केली. तीने मालदीवविरुद्धच्या सामन्यात केवळ 13 चेंडूत एकही धाव न देता हॅट्ट्रिकसह एकूण सहा बळी घेतले.
अंजलीने केलेली ही कामगिरी पुरूष आणि महिला अशा दोन्ही प्रकारच्या टी 20 क्रिकेटमध्ये ही विक्रमी ठरली आहे.
अंजलीने मलेशियाच्या मास एलिसाची कामगिरी मागे टाकली. चीनविरूद्ध एलिसाने सहा धावा देऊन 3 बळी मिळविले होते. पुरूष टी 20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम भारताच्या दीपक चहरच्या नावावर आहे. त्याने बांगलादेशविरूद्ध नोव्हेंबर महिन्यात 7 धावांत 6 बळी घेतले होते.
अंजली चंद हिने केलेली कामगिरी केवळ टी 20 क्रिकेटमध्येच नव्हे तर तीनही प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तिच्या कामगिरीमुळे मालदीवचा डाव 10 षटकांत 16 धावांत संपला. नेपाळने पहिल्याच षटकात केवळ 5 चेंडूत हा सामना जिंकला.