नियमांचे काटेकोर पालन करीत विवाह समारंभ
कार्ला – गेल्या दीड महिन्यापासून महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मावळ तालुक्यात विवाह समारंभ साध्या पद्धतीने व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहेत. या वर्षी करोनामुळे मोठ्या प्रमाणात होणारा विवाह खर्चाला फाटा बसल्याने विवाह समारंभ साध्या पद्धतीने होत असल्याने वधू व वर कुटुंबाची पैशाची मोठ्या प्रमाणात बचत देखील झाली आहे.
शिलाटणे येथील भानुसघरे व कार्ला येथील हुलावळे या दोन परिवाराने कुठल्याही प्रकारचा रुसवा फुगवा न धरता कोणाचा सत्कार नाही, जेवणावळी नाही, डामडौल न करता साध्या पध्दतीने विवाह करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेऊन वधुराणीच्या घराशेजारील छोट्याशा मंदिरात दोन्हीही कुटुंबातील पाच-पाच सदस्यांच्या उपस्थितीत वधू-वर व पंडित यांनी तोंडाला मास्क लावत हा विवाह समारंभ उत्साहात झाला.
दरवर्षी लाखो रुपये या विवाह समारंभ प्रसंगी होत असतात. जर अशाप्रकार साध्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाले, तर विवाह समारंभात लाखो रुपये होणाऱ्या खर्चावर निर्बंध घातले जाणार आहेत. यामुळे पुढेही साध्या पद्धतीने विवाह सोहळे व्हावेत, असे मत सर्वसाधरण नागरिक व्यक्त करीत आहेत.