मंचर -महाळुंगे पडवळ येथील नवविवाहितेला पती आणि दिराने चारित्र्याचा संशय घेऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच व्यवसायासाठी पैसे घेऊन ये, तरच तुला चांगले नांदवतो. या त्रासाला कंटाळल्याने नवरा, दीर यांच्याविरोधात शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याच्या आरोपावरून मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नवविवाहितेची बहीण सुरेखा दिपक राजपूत यांनी फिर्याद दिली. 16 मार्च रोजी बहीण वैशाली हिचे लग्न महाळुंगे पडवळ येथील सूरज साईनाथ डोके याच्याबरोबर मोशी-जाधववाडी येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात झाले.
आठ दिवसांनी तिचा पती सूरज आणि दिर सुरेश डोके हे तिच्यावर खोटे नाटे आरोप करू लागले, मारहाण केली. सोमवारी (दि. 4) तिच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने पुढील उपचारासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.