Lok Sabha Election 2024 । देशातील लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातील मतदान २० मेला पार पडणार आहे. त्यासाठी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत सभा घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नकली शिवसेना म्हणत टीका केली. या टीकेवर आज इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली.
एक दिवस भाजप संघाला देखील संपवेल… आणि मोदी उदयाला आरएसएसला ही नकली म्हणतील’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर पलटवार केला आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत त्यांना इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगताना ते म्हणाले,’ आम्ही इंडिया आघाडीची स्थापना देशातील लोकशाही आणि स्वातंत्र टिकवून ठेवण्यासाठी केली आहे, असं ठाकरेंनी म्हटलं आहे.ते पुढे म्हणाले,’गंमतीची गोष्ट अशी आहे की, आमच्या इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत. आम्ही वर्षाला एक पंतप्रधान करू शकतो, असं नरेंद्र मोदी म्हणतात. याचा अर्थ त्यांनी मानलेलं आहे की, भाजपचं सरकार येत नाही. आमच्याकडे चेहरा कोण हा प्रश्नच नाही. प्रश्न आहे तो भाजपकडे कारण त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा एकच चेहरा आहे”, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
हे वाचले का ? मोदींच्या रोड शोसाठी कोट्यवधींचा निधी कुठून आला? त्यांच्या रोड शोसाठी कुणी खर्च केला? संजय राऊतांचा सवाल