पिंपरी – मुंबईहून पुणेमार्गे साता-याला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत अडकले. त्यानंतर नागरिकांनी चांदणी चौकात होणा-या सततच्या वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनीच अनुभव घेतला असल्याने त्यांनी तात्काळ प्रशासनाला आदेश दिले आणि प्रशासन खडबडून जागे झाले. दोन दिवसांनी मुख्यमंत्री साता-याहून पुन्हा मुंबईला जात असताना त्यांनी प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला.
पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर सुट्टीसाठी शुक्रवारी (दि. 26) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या परिवारासह सातारा येथे जात होते. पुणे मार्गे जात असताना मुंबई-बेंगलोर महामार्गावर चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकला. महामार्गावर एक ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या होत्या. मला कुठलीही व्हीआयपी ट्रीटमेंट नको म्हणणारे मुख्यमंत्री अचानक वाहतूक कोंडीत अडकले आणि त्यांना सर्वसामान्य नागरिकांना दररोज तोंड द्याव्या लागणा-या समस्येचा अनुभव आला. मुख्यमंत्री दिसताच नागरिकांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत, साहेब ! इथे रोजच वाहतूक कोंडी होते. यावर काहीतरी तोडगा काढा, अशी विनंती केली.
चांदणी चौकात मुख्यमंत्री अडकले म्हणून प्रशासनाने धावपळ करून उपाययोजना केल्या. सर्वसामान्य पुणे, पिंपरी-चिंचवडकर दररोज ओरडून ओरडून प्रशासनाला सांगत होते. मात्र एक अधिकारी तिकडे फिरकल्याचे कधी ऐकिवात नाही. अधिकारी नियमित जात असतीलही पण मागील काही वर्षात तिथे झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात असं कुणालाही वाटलं नाही.
शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. तासंतास नागरिकांना कोंडीत अडकावे लागते. शहरात येणा-या सर्व रस्त्यांवर थोड्या-फार प्रमाणात वाहतूक कोंडी असतेच. चांदणी चौक एका दिवसात राज्यात चर्चेचा विषय झाला. तसेच शहरातील इतर रस्तेही प्रशासनाच्या चर्चेचा विषय व्हावेत आणि पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर सुट्टीसाठी शुक्रवारी (दि. 26) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या परिवारासह सातारा येथे जात होते.
पुणे मार्गे जात असताना मुंबई-बेंगलोर महामार्गावर चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकला. महामार्गावर एक ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या होत्या. मला कुठलीही व्हीआयपी ट्रीटमेंट नको म्हणणारे मुख्यमंत्री अचानक वाहतूक कोंडीत अडकले आणि त्यांना सर्वसामान्य नागरिकांना दररोज तोंड द्याव्या लागणा-या समस्येचा अनुभव आला. मुख्यमंत्री दिसताच नागरिकांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत, साहेब ! इथे रोजच वाहतूक कोंडी होते. यावर काहीतरी तोडगा काढा, अशी विनंती केली.
चांदणी चौकात मुख्यमंत्री अडकले म्हणून प्रशासनाने धावपळ करून उपाययोजना केल्या. सर्वसामान्य पुणे, पिंपरी-चिंचवडकर दररोज ओरडून ओरडून प्रशासनाला सांगत होते. मात्र एक अधिकारी तिकडे फिरकल्याचे कधी ऐकिवात नाही. अधिकारी नियमित जात असतीलही पण मागील काही वर्षात तिथे झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात असं कुणालाही वाटलं नाही. शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. तासंतास नागरिकांना कोंडीत अडकावे लागते. शहरात येणा-या सर्व रस्त्यांवर थोड्या-फार प्रमाणात वाहतूक कोंडी असतेच. चांदणी चौक एका दिवसात राज्यात चर्चेचा विषय झाला. तसेच शहरातील इतर रस्तेही प्रशासनाच्या चर्चेचा विषय व्हावेत आणि वाहतूक सुरळीत व्हावी, अशी भाबडी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत.
एका दिवसात नवीन वाहतूक विभागाची घोषणा
चांदणी चौकात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांकडून प्रत्येकी 50 असे 100 मार्शल नेमण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तर अवघ्या एका दिवसात चांदणी चौक परिसरासाठी नवीन वाहतूक विभाग सुरू केला. यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी आणि 20 कर्मचारी देखील नेमण्यात आले आहेत. एवढी तत्परता केवळ मुख्यमंत्र्यांना त्रास झाला म्हणून तर दाखवली मग नागरिकांसाठी का नाही? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
चांदणी चौकाचे झाले पण इतर ठिकाणांचे काय
-दापोडी ते खडकी पर्यंत प्रवासासाठी पीक
-अवर्समध्ये सुमारे अर्धा तास लागतो
-पुणे नाशिक महामार्गावर मोशी, चाकण येथे
-सातत्याने वाहनांच्या रांगा लागतात
-औंध रस्ता (शितोळे नगर पूल)
-जय गणेश साम्राज्य चौक, भोसरी
-भूमकर चौक, हिंजवडी
-कॅनबे चौक, तळवडे
-वाहतूक कोंडीची कारणे
-खड्डेमय रस्ते
-अरुंद रस्ते
-रस्त्यांवरील पार्किंग
-सिग्नल असलेल्या चौकात खड्डे
(त्यामुळे सिग्नलच्या काळात वाहनांचा वेग मंदावतो)
-वाहनांची वाढणारी संख्या
-बेशिस्त वाहतूक