आळंदी -करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली असताना आळंदी शहरातील नागरिक याची गांभीर्याने दखल घेत नाहीत.
सर्व नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून शहरातील विविध किराणा दुकाने आणि भाजीपाला दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे खेड तहसीलदार सुचित्रा आमले यांनी सांगितले.
कोणीही दुपारी एकनंतर किराणा दुकाने आणि भाजीपाला दुकाने सुरू असल्यास त्यांच्यावर आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.