हैदराबाद, दि. 16- सूर्यापेठ जिल्ह्यात एका आईने घरगुती भांडणामुळे वैतागून स्वतःच्या दोन मुलांना तलावात फेकल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, हिम्मत न झाल्यामुळे ती तलावाकाठी बसून रडत राहिली. स्थानिक लोकांनी तक्रार केल्यामुळे पोलिसांनी तलावातून दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सूर्यापेठ जिल्ह्यातील सिंगीरेड्डी पालेम या गावात राहत असलेल्या जोडप्यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र पतीला दारूचे व्यसन लागल्याने त्यांच्यात भांडणांचा खटका उडत असे. रात्री झालेल्या भांडणामुळे वैतागून तिने 9 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांच्या मुलीला घेऊन घराबाहेर पडली. स्थानिक सिद्दुला तलावापाशी येऊन ती थांबली. त्यानंतर तिने दोन्ही मुलांना तलावात फेकले.