मुंबई : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील कॅन्टिनच्या चहामध्ये अळ्या निघाल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच कॅन्टिनमध्ये निकृष्ट दर्जाचे पदार्थ मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चहातील अळ्या निघण्याच्या प्रकरणी आता महाराष्ट्र सदन प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका वृत्त वाहिनेने याविषयी माहिती दिली आहे.
एवढेच नाही तर कॅन्टिनमध्ये स्वच्छतेचादेखील मोठा प्रश्न असून सर्वत्र अस्वच्छता असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याठिकाणचे इतर पदार्थ देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आल्याचे या वृत्तवाहिनीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील याच कॅंटीनमध्ये रोज हजारो जण जेवण,नाश्ता करतात. मात्र प्रशासनाचा हा भोंगळ कारभार इथे येणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे पाह्यला मिळत आहे.