कोरोनाशी लढण्यासाठी सरकारी यंत्रणा दिवस रात्र काम करत आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला असून आज त्याचा ९ वा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी, ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केले आहे.
Listened to the Pradhan Showman. Nothing about how to ease people’s pain, their burdens, their financial anxieties. No vision of the future or sharing the issues he is weighing in deciding about the post-lockdown. Just a feel-good moment curated by India’s Photo-Op PrimeMinister!
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 3, 2020
मोदींच्या याच आवाहनावर आता टीकेची झोड उठली आहे.अशातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मोदींवर ट्विटच्या माध्यमातून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मोदींच्या भाषणात लोकांच्या वेदना, त्यांचे ओझे, त्यांची आर्थिक चिंता कशी कमी करावी याविषयी काहीही नाही. भविष्याविषयी किंवा लॉकडाऊननंतर काय याविषयी कोणतीही माहिती नाही. पंतप्रधान फक्त शो बाजी करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.