लंडन – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेली जवळपास तीन दशके डकवर्थ-लुईस नियम राबविला जात आहे. हा नियम ज्यांनी तयार केला त्याच जोडीतील टोनी लुईस यांचे निधन झाले आहे. गणितज्ज्ञ असलेले लुईस 78 वर्षंचे होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या सामन्यात पावसाने व्यत्यय आला किंवा अन्य कोणत्याही कारणाने खंड पडला तर या नियमाच्या आधारे पुढे खेळ होत होता. या नियमाची अंमलबजावणी सुरु होण्यापूर्वी ज्या संघाची धावा करण्याची सरासरी जास्त असे त्यालाच विजेता घोषित केले जात होते.
क्रिकेटचे नियम तयार करणारा मेरिलिबोर्न क्रिकेट क्लबनेच (एमसीसी) फ्रॅंक डकवर्थ व टोनी लुईस यांनी दिलेली गणितीपद्धत स्वीकारली व त्याची अंमलबजावणी सुरु झाली. पावसामुळे किंवा अन्य कारणाने सामन्यात खंड पडला, विरुद्ध संघाला किती धावांचे लक्ष्य द्यायचे याचा नियम डकवर्थ-लुईस जोडीने तयार केला. अर्थात यावर क्रिकेटचाहते चांगलेच नाराज होते. हे क्लिष्ठ नियम राबविण्यापेक्षा पूर्वीचीच पद्धत चांगली होती असेही आजी माजी खेळाडूंनीही मागणी केली होती.
1992 सालच्या विश्वरंडक स्पर्धेतील इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 13 चेंडूत 22 धावांची गरज होती. पण पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबला पण जुन्या नियमाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेला 13 चेंडूत 21 धावांचे लक्ष्य देण्यात आले. त्यावेळी पुन्हा पाऊस आला व सामना थांबला. त्यानंतर जेव्हा खेळ सुरु झाला तेव्हा नियमानुसार 2 षटके कमी करण्यात आली व दक्षिण आफ्रिकेसमोर 1 चेंडूत 22 धावा करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. त्यावेळी नियमाने केलेली क्रुर चेष्टा असल्याची टीका झाली होती व त्यानंतर एमसीसीने डकवर्थ-लुईस नियमांची अंमलबजावणी सुरु केली.