बीड – राष्ट्रवादीतील फूटीनंतर आज बीडमध्ये शरद पवार यांची सभा पार पडली. यादरम्यान पंतप्रधानांनी मणिपूरला जाण्याची आवश्यकता होती असं म्हणत पवारांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
“माझं वय झालं म्हणायला तुम्ही माझं काय बघितलं. तुम्हाला सत्तेच्या बाजूला जायचं तर जा. पण ज्यांच्या जिवावर तुम्ही निवडून आलात, त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवा.ते नाही केलं तर लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.” अशी टीका शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर केली.
लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. भाजपाचा पराभव केला. त्यांचा पराभव घेऊन तुम्ही सत्तेत आलात आणि आज भाजपाच्या दावणीला बसायची भूमिका तुम्ही मांडत आहात. उद्या मतदान करण्यासाठी लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल, तेव्हा कोणतं बटण दाखवायचं आणि तुम्हाला कुठे पाठवायचं हा विचार मतदार केल्याशिवाय राहणार नाही असंही पवार यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला त्यावर बोलताना पवार म्हणाले,देवेंद्र फडणवीस यांनी देखील हाच नारा दिला होता मात्र ते पूर्वी पेक्षाच्या खालच्या पदावर आले अशी आठवण देखिल यावेळी शरद पवार यांनी यावेळी करून दिली.