सासवड – पुरंदर तालुक्यामधील गावठाणासह वाड्या-वस्त्यांना पाण्याची तीव्र टंचाईमुळे तालुका दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. पुरंदर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. त्यातच गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने टॅंकरची मागणी आता जोर धरू लागली आहे.
तालुक्यामध्ये सध्या 7 गावांना टॅंकरने 57 वाड्यावस्ती 21622 लोकसंख्या 12 शासकीय/खासगी टॅंकर त्याचबरोबर 59 खेपांच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे सध्या सोनोरी, वाल्हे, वागदरवाडी, रिसे, पिसे, राजुरी, साकुर्डे, जवळार्जुन (विभाडवस्ती) दौडज, दिवे, झेंडेवाडी अशा गावांना एकूण सात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून या गावांमध्ये प्रत्येकी एक टॅंकर सुरू आहे. तर मावडी कडेपठार ग्रामपंचायतींनी टॅंकरच्या मागणीचा प्रस्ताव प्रलंबित आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत तर पिण्याच्या पाण्याची देखील नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे तर जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणावर भेडसावणार आहे. प्रशासनाने मात्र दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केलेली आहे. दीपावली नंतर लग्नसमारंभ, विधी आदींसाठी खासगी टॅंकर मागवावे लागणार आहेत. दरम्यान, सध्यस्थितीत पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
मंडल निहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
सासवड – 366
जेजुरी – 342
राजेवाडी 129
वाल्हे – 263
परिंचे – 178
कुभांरवळण – 197
भिवडी – 244