गराडे (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यात गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने मानवासह वन्यप्राण्यांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. या पाणीबाणीमुळे मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाच्या वतीने वनक्षेत्रालगत असलेल्या मालकी क्षेत्रात तसेच वनक्षेत्रात कृत्रिम स्वरूपाचे पाणवठे तयार केले आहेत, अशी माहिती सासडचे वनविभागीय अधिकारी विकास चव्हाण यांनी सांगितले.
पावसाळा सुरू होण्यासाठी अजून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी असल्याने पाणीसाठा कधी होईल हे माहित नसून वन विभागाच्या वतीने सर्व ठिकाणी पाण्याची सोय करण्यात येत आहे . दरम्यान, जेजुरीतील जय मल्हार फाउंडेशन यांच्या वतीने पाण्याची सोय केली जात आहे,
एस एस इंटरप्राईजेस चाकण त्याचबरोबर दगडूशेठ हलवाई यांच्या वतीने ही पाण्यासाठी सहकार्य केले जात असून अजून इच्छुक असतील त्यांनी वन विभागाशी संपर्क साधून वन्य प्राण्यांच्या संवर्धन, संरक्षण संगोपनासाठी आपला खारीचा वाटा नोंदवावा, असे आवाहन पुरंदर तालुका वनविभागाने केले आहे.