बारामती – करंजेपुल येथील “जय शंभो गृप ” च्या सात जणांनी प्राणघातक हत्यारासह एकत्र येवुन शेजारच्या गावातील युवकाना लाथा बुक्क्यानी मारहाण केली, शिवीगाळ करुन ठार मारण्याच्या धमकी दिली असे विविध गुन्हे दाखल असलेले संशयीत महेश उर्फ मयुर मोहन बांदल ,हरीदास भानुदास गायकवाड,केतन उर्फ आबा शहाजी गायकवाड,सागर बाळासाहेब फाटे ,गणेश सुरेश भंडलकर सर्व रा – करंजेपुल व गणेश मल्हारी मोरे व सोमनाथ सिताराम तांबे रा ..मुर्टी ता बारामती यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
बारामतीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती नेहा रणवीर यांचेसमोर हा (वारंट ट्रायल )हा खटला चालला आरोपीच्या वतीने ॲड. जी .एम .आळंदीकर यानी काम पाहीले . अधिक वृत्त असे की सन २०१७ साली सोमेश्वरच्या ईंजिनिअरींग महाविद्यालयासमोर करंजेपुल चे वरील तरुण व वाणेवाडीतील तरुणांची भांडणे चालु असताना फिर्यादी आकाश संजय पवार याने वाणेवाडीतील मुलाना गाडीवर सोडवले त्याचा राग धरुन संध्याकाळी करंजेपुल च्या वरील संशयीतानी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या डिस्टलरी गेट समोर आकाश पवार व सागर पवार ईत्यादीना गाडी अडवुन लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली व लोक गोळा झालेवर ठार मारणेची धमकी देवुन पसार झाल्याचा आरोप फिर्यादीत करणेत आला होता. त्यानुसार वडगाव निंबाळकर पोलीसानी भा दं.वि.१४३,१४७,१४९ ,३२३ ,३४१ ,५०४ ,५०६ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन दोषारोप पत्र दाखल केले होते .
सरकार पक्षाद्वारे दोन साक्षीदार तपासण्यात आले. एका साक्षीदाराचा खटल्याच्या काळात अपघाती मृत्यु झाला .उर्वरीत साक्षीदारांचा आरोपीच्या वतीने आळंदीकर यानी उलटतपास घेतला.उलटतपासात केलेली कथने व पोलीस तपासातील जबाब यात विसंगती असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने संशयीत आरोपींची निर्दोष मुक्तता केली . ॲड आळंदीकर याना ॲड प्रांजली पांढरे यानी सहकार्य केले .