मुंबई : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात सकाळी साडे आठच्या वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला . उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.
ना.धों. महानोर यांची ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘रानातल्या कविता’ गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली. त्यांच्या निधनाने अवघं साहित्यविश्व शोकाकूल झाले आहे. ना. धो. महानोर यांचे लिखाण हे निसर्गाशी नाते जोडणारे होते.
‘मी रात टाकली..मी कात टाकली’ ही त्यांच्या लोकप्रिय गीतांपैकीच एक रचना आहे. त्यांचा’रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह खूप गाजला होता. स्वत: शेतकरी असल्याने निसर्ग, शेतीविषयी असलेले प्रेम त्यांच्या कवितेतून झळकायचे. महानोरांच्या पार्थिवावर उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.