वाघोली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हवेली मधून लोकाभिमुख नेतृत्वाला पाठवण्याबाबत सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांच्यात केसनंद येथील कार्यक्रमात एकमत पाहायला मिळाले.
केसनंद येथे विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांचे तालुक्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी हवेली मधून लोकाभिमुख नेतृत्वाला संधी देऊन पुढील पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्राच्या विधानसभेवर हवेलीचा आमदार पाठवा अशी एक मुखाने मागणी करण्यात आली.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजप राज्य कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, पुणे जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके, विकास दांगट पाटील, दिलीप काळभोर, मिलिंद हरगुडे, राजेंद्र सावंत, तानाजी हरगुडे, संतोष हरगुडे, तानाजी बांगर, संतोष हरगुडे, शंकर वाबळे, पंडित वाबळे, श्रीहरी बांगर, रमेश हरगुडे, दिलीप हरगुडे, अशोक गावडे, नामजी हरगुडे, सुरेश हरगुडे, विपुल गायकवाड, विक्रांत पाटोळे, सचिन हरगुडे, गणेश हरगुडे, बाबासाहेब हरगुडे, केसनंद ग्रामपंचायत सरपंच नितीन गावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद हरगुडे, सचिन हरगुडे, विशाल हरगुडे, दत्ता हरगुडे, सुजाता गायकवाड, ग्रामसेवक ढवळे भाऊसाहेब आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.